ख़रीवली (सो) येथील १९० सातबारा धारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले असल्याची कृषी सहाय्यक यांनी दिली माहिती
शहापूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे तयार झालेले, हातातोंडाशी आलेले भातपिक अक्षरशः कुजुन गेले आहे. आज(दि.२३)खरीवली(सो)येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतातील भातपीकाच्या नुकसानीची पाहणी केली.
शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सुभाष हरड़ ,सरपंच बाळू वाघ, कृषि सहायक बी. वाय. ताठे आदींनी शेतकऱ्यांच्या भात पीक नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी उपसरपंच चंद्रकांत हरड़,नानूराम हरड़, चंदू आप्पा हरड़, मुकुंद हरड़ आदिसह शेतकरी उपस्थित होते.
ख़रीवली (सो) येथील १९० सातबारा धारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले आहेत. सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी यांनी केलेले संयुक्त पंचनामे मदतीच्या कार्यवाहीसाठी शहापूर तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत अशी माहिती कृषि सहायक ताठे यानी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
324 total views, 1 views today